रविवार, १९ डिसेंबर, २०१०

मुक्तपीठ पहिली भेट

मागील वर्षीची म्हणजे २००९ मधील दिवाळी... आम्ही सगळे पुण्याला जायचे ठरवलेले. मग पुण्यात जातच आहोत तर मुक्तपीठच्या जमेल तेवढ्या सदस्याना भेटायचे असे ठरवलेले. त्यानुसार आधीच मुक्तपीठवर आणि चॅटवर सौ ज्योती पळसुले आणि तिचे मीस्टर चिंतामणी (जिजु) यांच्याशी बोलुन ठरवले. भेटायचे ठिकाण म्हणजे पळसुले यांचे घर असे सर्वानुमते ठरल्यावर दिवस पण निश्चित केला. ज्योतीला म्हणले मी सकाळीच येते फ़ार तर मदतीला. ती हो म्हणाली आणि मी आणि माझी कन्या सकाळीच माझ्या मैत्रिणीच्या घरातुन १० च्या दरम्यान निघालो. यावेळेपर्यंत मी कधीच ज्योती आणि जिजुंना भेटले नव्हते. ते म्हणाले शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर येउन थांब माझी पिवळ्या रंगाची मारुती आहे. त्यांच्या बरोबर नरेंद्र कुलकर्णी याने पण येउन मला सुखद धक्का दिला. त्याला पण प्रथमच भेटत होते मी. घरी पोचल्यावर ज्योतीने मस्त स्वागत केले. जिजुंशी बोलता बोलता संध्याकाळी येणार्‍या सदस्याना फ़ोन लावणे चाललेले.पशा आमचा लाडका भाऊ खुप आजारी असल्याने येउ शकणार नाही असे समजल्याने खुपच नाराजी झाली पन अभिजीत कडुन त्याचा नंबर घेउन प्रथमच त्याच्याशी बोलले आणि यायचा आग्रह केला. बघु कसे जमते ते असे तो बोलला. तसेच अजुन पण फ़ोन चालुच होते.मी या सगळ्यांना भेटायला खुपच उत्सुक होते...

त्यानंतर ज्योतीने आवडीचे बटाट्याचे परोठे चटणी आणी दहीभात असा तिला साधा वाटणारा मेन्यु केला पण मला खुपच आवडला तो. दुपारी गप्पा मारत संध्याकाळच्या मेन्युची तयारी करत वेळ मस्त गेला. मी ४/५ दिवस ऑनलाइन नसल्याने अधुन मधुन जिजु मुपी चे वार्तांकन करत होते आणि हसवत होते. संध्याकाळची तयारी करुन झाल्यावर मी, ज्योती आणि माझी कन्या गौरी जरा तुळशी बागेत फ़ेरफ़टका मारुन आलो. ( तुळशीबाग म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आम्हा बायकांचा[:P])

संध्याकाळसाठी ईडली चटणी सांबार असा बेत होता. जोडीला फ़राळाचे पदार्थ होतेच,मी इकडुन बेसनाचे लाडु आणि चकली भरपुर नेलेली.संध्याकाळी आम्ही सगळेच आवरुन वाट बघत बसलेलो सगळ्यांची. अजुन माझे अहो, मुलगा, मैत्रिण आणि तिची कन्या पण यायचे होते.

यथवकाश आरती आली आणि तिच्या बोलण्यावरुन तीला ओळखले मी. तीपण किचन मधे आमच्या मदतीला लगेच हजर झाली. आणि आमच्या घरच्या मंडळींचे आगमन झाले. यांची आणि माझ्या मैत्रिणीची ज्योती आणि जिजुंशी ओळख करुन दिली... मग नरेंद्र दुपारी जे अर्ध्या तासात येतो परत असे सांगुन जे गेलेला त्याचा पत्ताच नव्हता तो उगवला. मागोमाग अभिजीत आणि अक्षु पण आले. पशाला फ़ोन केला तर म्हणाला मी दवाखान्यात आहे आलोच १५ मिनीटात. १५ मिनीटात खरोखरच तो आला... पशाला पाहिल्यावर खरच काय वाटले ते नाही फ़ारसे शब्दात मांडता येणार पण त्याच्या लिखाणावरुन त्याच्याबद्दल जी अपेक्षा केलेली तसा तो नव्हता एवढे मात्र निश्चित... सुरुवातीला एकदम मितभाषी गप्प वाटणारा पशा नंतर मात्र जे सुरु झाला ते जाइपर्यंत... अभिजीत बद्दल तर काय बोलु? त्याच्यासारखा माणुस आपला मित्र आहे आणि आपल्याशी बोलतोय हेच माझ्यासाठी खुप होते. एवढा हुशार, बरेचसे मोठ्या मोठ्या व्यक्तींकडुन सत्कार झालेला माणुस बोलायला एकदम नम्र आणि खुप उत्साही, प्रचंड दंगेखोर... त्याच्या लपलेला एक लहान खट्याळ मुलगा जाणवत होता पदोपदी...एरवी मुक्तपीठवर सतत बडबड करणारा अक्षु मात्र खुपच शांत बसलेला की एखाद्याला सांगितले तरी खरे वाटणार नाही की हा मुलगा एवढी बडबड करतो...सगळ्या खायच्या पदार्थांचा आस्वाद घेत सगळी मस्त गप्पा मारत होती.. पशा फ़ल्त बाटलीभर लिंबुसरबत पिला कारण त्या शिवाय त्याला काहीच खायचे प्यायचे[:P] नव्हते. जिजु मधे मधे कॅमेरा सरसावुन फ़ोटो काढत होतेच. यांची परत एकदा सगळ्यांची ओळख करुन दिली...आणि मग आम्ही सगळेच ९ ते ९.३० च्या दरम्यान तेथुन बाहेर पडलो...त्यादिवशीची भेट एकदम मस्त अविस्मरणीय झाली...

गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

Pune Air shraddha...

नमस्कार मित्र मैत्रिणींनो.... बुधवार दिनांक ८.१२.२०१० रोजी पुणे आकाशवाणीवर फ़ोन इन या कार्यक्रमा मधे मी एक आठवण सांगितली होती त्याचे हे रेकॉर्डींग आहे...

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०

बीटची बर्फ़ी


साहित्य : २ मोठे बीट, खवा अर्धा पावशेर, साखर १ मोठी वाटी,वेलदोड्याची पुड १ मोठा चमचा,बारीक तुकडे केलेले काजु अर्धी वाटी, १ चमचा तुप, बर्फ़ी वर लावायला चांदीचा वर्ख.







कृती :- प्रथम बीटची साले काढुन घेउन ते किसुन घ्यावे. किसलेले बीट मिक्सरमधुन बारीक करुन घ्यावे.












मिक्सरवरुन बारीक केलेले बीट जाड बुडाच्या कढईत कोरडे होईपर्यंत परतुन घ्यावे. कोरडे झालेले बीट एका डीश मधे काढुन घेउन त्याच कढईत खवा परतायला घ्यावा.खवा चांगला लाल होइपर्यंत भाजावा.
खवा लालसर झाल्यावर त्यात आधी परतुन घेतलेले बीट घालुन त्यातच साखर घालावी आणि मिश्रण एकजीव करुन परत घट्ट होइपर्यंत परतावे.हे मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलदोड्याची पुड आणि काजु घालावेत. मिश्रणाचा थापता येइल असा गोळा तयार झाला की तो तुप लावुन ठेवलेल्या डीश मधे घेउन वर प्लॅस्टीकचा कागद ठेऊन एकसारखे थापावे















थोडे कोमट झाले की त्याच्या वड्या पाडाव्यात आणि त्यावर चांदीचा वर्ख लावुन लावुन त्या वड्या डीश मधे काढुन सर्व्ह कराव्यात....



टीप :- आपण असेही या वड्या करु शकतो. कोरडा झालेला बीट आणि खवा एकत्र करुन परत चांगले परतुन घ्यावे. घट्ट होइपर्यंत. आणि गार झाल्यावर त्यात पिठीसाखर घालावी जसे आपण बेसनाच्या लाडवाला घालतो तसे आणि वड्या थापाव्यात.

बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०

आशु



अश्विनी
....


ऑर्कुटवर मैत्री झालेल्यामधील ही अगदी जवळची मैत्रिण. एका मित्रामुळे हिची ओळख झाली. आणि ही नेटवरची ओळख अगदी गाढ मैत्रीत केव्हा रुपांतरीत झाली कळलेच नाही. साधारण महिने आम्ही गप्पा मारत होतो चॅटवर. एकमेकींची सुखदुःखे शेअर करीत होतो. माझ्यापेक्षा जराशीच लहान असलेली ही मैत्रिण अत्यंत भावुक होती आणि आहेही. अशाच गप्पांमधुन तीची आई नसल्याने ती आणि तिचे मिस्टर, मुलगा तिच्या माहेरीच राहतात असे समजले. त्यामुळे माहेरपणाला जायचे म्हणजे कुठे जायचे हा प्रश्न कायमच तिच्यासमोर असायचा. मला एक दिवस म्हणाली " शरु मी तुझ्या घरी येउ? माहेरपणाला दिवस? " आयला सॉलीडच... कारण अशा नेटवरच्या ओळखीतुन घरी येते म्हणालेली ही पहिलीच. मी माझ्या नवर्याशी बोलुन सांगुन टाकले तीला की तु कधीही येउ शकतेस आमच्या घरी. आणि मग तीने तीच्या नवर्याशी बोलुन येण्याचा दिवस पक्का केला. एका रवीवारी सायंकाळी तीचे आगमन सांगलीत झाले आणि माझ्या नवर्याबरोबर( माझे मीस्टर सांगलीत नोकरीस असतात) ती घरी आली आणि फ़क्त फ़ोटो मधे पाहिलेल्या आम्ही प्रत्यक्ष पाहत्या झालो :) दारातच एकमेकींच्या गळ्यात पडलो. असे वाटलेच नाही की आमची मैत्री नेटवरची आहे. बालमैत्रिणी भेटलो बरेच दिवसानी असे वाटत होते. मे महिन्याचे दिवस असल्याने आमरसाचा बेत केलेला. मस्त भरपेट हादडुन आम्ही रात्री पर्यंत गप्पा मारल्या. गप्पा मारता मारताच झोप लागली म्हणा ना...:) दुसर्या दिवशी मी, आशु, माझी कन्या आणि मीस्टर असे सगळे कोल्हापुरला देवीच्या दर्शनाला गेलो. दर्शन घेउन मस्त हातात हात घालुन बागडत कोल्हापुर हिंडलो. अगदी लहानपण अनुभवले. ती असतानाचे दोन तीन दिवस खरच खुप मजेत गेले. सध्या लहानपणच्या रुसण्याचा अनुभव घेतेय. :(

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

नमस्कार...

सगळ्यांचे ब्लॉग आजपर्यंत वाचत होते आणि आहेही. बर्‍याच जणांनी मला विचारले की तुझा ब्लॉग नाहीय का? पण मी काही लेखिका नाहीय की कविता करत नाही तर करायचाय काय ब्लॉग? या दिवाळीत नेहमीप्रमाणेच कचकुन ५ दिवसाची सुट्टी मिळाली कंपनीला. डोक्यात दिवाळीचे विचार तर होतेच पण माझ्या आयुष्यात नव्यानेच प्रवेश केलेल्या इंटरनेट जगताचे विचार पण होतेच. त्यातच एक विचार आला की आपण आपला ब्लॉग तयार करायचा विचार एका क्षणात चमकुन गेला. पण लिहायचे काय? आपल्याला जे आवडेल ते लेखन/कविता? छे आजीबात नाही...मग एक नवाच विचार सुचला मला. मी नेटवर भेटलेल्या बर्‍याच व्यक्तींना प्रत्यक्ष भेटते. तर अशा व्यक्तीना भेटल्यावर मला काय वाटते याचे शब्दांकन इथे करावे असे सहजच मनात आले आणि आज ते अमलात आणायला सुरुवात केली.

तसेच माझ्या या ब्लॉगवर मी स्वता काढलेली छायाचित्रे तसेच काही पाककृती छायाचित्रांसहीत देणार आहे.